Marathi Blog
Wealth Blog


   +91 7039131213   samarthinvestor@gmail.com

कोरोनाकाळातील पहिली दिवाळी

कोरोनाकाळातील पहिली दिवाळी

आपण आत्तापर्यंत म्हणजे मार्च २०२० ते आज तारखेपर्यंत (ऑक्टोबर २०२०), कुठल्याही लस वा औषधाविना कोरोनाचा सामना केला आहे तसाच त्याच्यावरील उपचार आल्यावरही करावा लागणार आहे, हे मनाशी पक्क करा. आत्तापर्यंत आपण अनेक सण-उत्सव ह्या कोरोना काळात साजरे केले तेही सरकारने आखून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक (सोशल डिस्टंसिन्ग आणि स्वच्छतेचे नियम वगैरे) नियम पाळून, विशेष म्हणजे त्यात गणपती सारखा सर्वांचा लाडक्या सार्वजनिक सणाचा हि समावेश होता. आपण आता ह्या सवयींशी मिळते-जुळते घ्यायला शिकलो आहे आणि येणारे सण-उत्सव हि असेच साजरे करावे लागणार, त्याला काही पर्याय नाही.

नमस्कार वाचक मित्रांनो. तुम्ही आत्तापर्यंत दाखविलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद कारण मी लिहिलेले लेख तुम्ही आवडीने वाचता आणि प्रामाणिक प्रतिक्रियाही देता. आत्तापर्यंत कोरोना ह्या विषयावर माझे व इतरांचे अनेक लेख वाचले असतील, तरीही मी आज कोरोनावरचा आणखी एक लेख सादर करीत आहे व पुढे अजूनही येतील कारण विषयच तसा आहे.

चला आता विषयाकडे वळूया. विषय वाचून थक्क झाला असाल वा धक्काही बसला असेल. तुम्हाला वाटत असेल कि हा पाहुणा अर्थात कोरोना जाणार नाही कि काय? हो, तो कायमचा जाणे हे आतातरी शक्य नाही असेच वाटते आणि सरकारच्या काही ब्रीदवाक्य आणि उपक्रमांवरून हेच सिद्ध होते. तसेही असे अनेक साथीचे रोग आले, आणि इथलेच बनून राहिले, उदा. स्वाईन फ्लू, प्लेग, बर्ड-फ्लू असे अनेक आले, आपण त्यांच्या साथीने जगायला शिकलो आणि त्यांच्याशी लढायला हि. कोरोना वर लस व औषध येईलही पण तो कायमचा जाईल हे आता शक्य नाही आणि त्याच्यावर उपचार येईपर्यंत स्वतःला सांभाळणे हेच फक्त आपल्या हातात आहे. अशा उदाहरणांवरून असंच सिद्ध होते कि जे नवीन रोग येतात त्यांचे औषध जरी उपलब्ध झाले तरीही त्यांचा मुळापासून नायनाट करणे अद्यापि तरी शक्य झालेले नाही. ह्याचा असाही अर्थ होतो कि आपल्याला अशा रोगांबरोबर जगण्याची कला अवगत आहे वा सवय होऊन गेली आहे आणि आपण आतापर्यंत कोरोनाला हि स्वीकारले आहे, ते अनलॉकच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. आपण कोरोनाला हरवू शकतो याचा अर्थ असा नाही कि त्याला मारू शकतो, फक्त त्याचे प्रमाण कमी करू शकतो. हुश्श, कोरोनाची वाहवा व विश्लेषण बस झाले असं वाटतं कारण मूळ मुद्दा बाजूला राहत आहे.

तर जसे आपण आत्तापर्यंत म्हणजे मार्च २०२० ते आज तारखेपर्यंत (ऑक्टोबर २०२०), कुठल्याही लस वा औषधाविना कोरोनाचा सामना केला आहे तसाच त्याच्यावरील उपचार आल्यावरही करावा लागणार आहे, हे मनाशी पक्क करा. आत्तापर्यंत आपण अनेक सण-उत्सव ह्या कोरोना काळात साजरे केले तेही सरकारने आखून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक (सोशल डिस्टंसिन्ग आणि स्वच्छतेचे नियम वगैरे) नियम पाळून, विशेष म्हणजे त्यात गणपती सारखा सर्वांचा लाडक्या सार्वजनिक सणाचा हि समावेश होता. आपण आता ह्या सवयींशी मिळते-जुळते घ्यायला शिकलो आहे आणि येणारे सण-उत्सव हि असेच साजरे करावे लागणार, त्याला काही पर्याय नाही. आता सण साजरे करण्याची पद्धत हि बदलावी लागेल कारण अतिउत्साह आणि कुचराई आपल्याला कोरोनाच्या विळख्यात घेऊन जाऊ शकते. सण-उत्सव साजरे व्हायलाच पाहिजे, त्याला कोणी नाही म्हणणार नाही अगदी सरकारही नाही पण नियमांचे पालन करून आणि जबाबदारी समजून. तर येणारा दिवाळी हा सण हिंदू धर्मीय तसेच इतर धर्मांतील लोकही साजरे करतात परंतु साजरे करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. हिंदू धर्मियांची दिवाळी हि पारंपरिक पद्धतीने साजरी होते, ज्यात पहिले पाच महत्वाचे दिवस आणि तुलसी विवाहाच्या विधीने पूर्णत्व येते. या महिन्याभराच्या काळात विविध पूजा, नात्यांची जपणूक, तसेच निरनिराळ्या खाद्यपदार्थांबरोबर फटाक्यांना आणि भेटवस्तूंना हि तितकेच स्थान आहे. हिंदू धर्मियांव्यतिरिक्त अन्य लोक फटाके आणि भेटवस्तूंवर जास्त भर देऊन दिवाळी साजरी करतात.
आता विषयाकडे अधिक लक्ष केंद्रित करताना मी तुम्हाला या कोरोना काळातील पहिली दिवाळी कशी साजरी करता येईल, हे सांगू इच्छितो. दिवाळी साजरी करताना वर नमूद केल्याप्रमाणे सर्व काही करा पण सर्व नियमांचे पालन करूनच. सार्वजनिक ठिकाणी वा आपल्या घरात गर्दी करू नका, आप्तेष्टांकडे जाण्याचे टाळा, फटाक्यांचा वापर कमी करा, आणि मास्क हा तर एक दागिना म्हणूनच कायम आपल्या वापरात असू द्या. आता शेवटची महत्वाची गोष्ट जी आता एक फॅशन म्हणून आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक व्यवहारात प्रसिद्ध झाली आहे ती म्हणजे “भेटवस्तू”. तर माझे या गोष्टीला मनाई नाही पण जर का तुम्हाला द्यायचंच असेल तर जीवनावश्यक वस्तू द्या जेणेकरून आपल्या नातेवाईक आणि मित्र-मंडळींमधील नातं हि अतूट राहील. तर अशा कुठल्या जीवनावश्यक वस्तू ह्या कोरोना काळात उपयोगी येतील? तर फेस-मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज, अँटी-सेप्टिक लिक्विड, ई, वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता, जेणेकरून त्या वस्तू वापरातही येतील आणि त्याबद्दल तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून मनापासून आशीर्वादही मिळतील. आहे ना हि भन्नाट कल्पना. अजून काही भेटवस्तू द्यायच्या झाल्या तर गरजवंतांना आर्थिक मदत, धान्यांची रसद, तसेच आपले शेजारी, नातेवाईक आणि मित्र-मंडळींसाठी कायम तत्परतेने पाठीशी उभे राहा हि देखील एक अनोखी भेट ठरेल.

ह्या कोरोना रोगाची एवढी दहशत आहे कि माणसे माणसाला परकी झाली आहेत. असे दिसून आले आहे कि एखादा व्यक्ती कोरोनाग्रस्त झाला तर त्याला वाळीत टाकल्यासारखी वागणूक मिळू लागते. नियम तर इतके कठोर आहेत कि कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम दर्शनही त्यांच्या नातेवाईकांना घेता येत नाही, हि भयाण वस्तुस्थिती आहे. माझं एवढंच म्हणणं आहे कि काळजी व जबाबदारी घेऊन कोरोनावर मात करता येते हे उघड आहे, त्याचबरोबर नाती आणि सण-उत्सव हि जपता येतील हे लक्षात ठेवा, ज्यासाठी वैद्यकीय यंत्रणा व सरकार दिवसरात्र राबून कोरोनावर उपाययोजना करत आहेत.

थोडक्यात काय तर कोरोनासोबत राहूनच आपल्याला पुढील आयुष्य जगायचे आहे आणि सण-उत्सव साजरे करायचे आहेत. दिवाळी असो वा इतर कोणताही सण, जिथे तुम्हाला भेटवस्तू द्यायची वेळ येईल वा इच्छा होईल, तिथे सध्यातरी कोरोनाला प्रतिबंध करण्यास मदत होईल अशाच वस्तूंना प्राधान्य द्या, एवढीच विनंती.

माणुसकी जपून सण-उत्सव साजरे करा आणि सर्वांपुढे आदर्श ठेवा.

आणि जर खरंच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचावा.

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *